सुदैवाने आजच्या पौर्णिमेपर्यंत मला तिला हात लावायचा मोहही झालेला नाही. संकल्प जाहीर केले की ते पूर्ण करण्यासाठीची जबाबदारी ते माहिती असणाऱ्यां बरोबर वाटली जाते. आज तसेच व्हावे म्हणून तो संकल्प जाहीर करतोय. फिरतांना बाईक किंवा मोपेडची मदतही घ्यायची नाही आणि स्वतः चालवायचीही नाही. हा वर्षभराचा संकल्प आहे. चारचाकीचा वापर हा चांगल्या रस्त्यां अभावी फारच मर्यादित प्रमाणात होत असल्याने, आणि तोही एकट्यासाठी कधीच करत नसल्याने तिला या संकल्पातून सूट मिळाली. पुण्यामधे वारंवार जाणं होतंय. पण तिथे जेव्हा केव्हा जाईन तेव्हा गेल्यावर शिवाजी नगर स्थानकाजवळ सायकलची सोय झाली तर संकल्प काटेकोर पाळण्यास मदत होईलच.
तसा हजार हा आकडाच मला माझ्या कल्पना विश्वात घेऊन जातो.
"पावसाळ्यातल्या आषाढात, खंडाळ्याच्या घाटातला प्रवास करून पुणे विद्यापीठातल्या संस्कृत विभागात वेदाच्या तासाला मी बसलो आहे. त्यात बाई अथर्ववेदातील वरुणदेवाचे मंत्र शिकवता आहेत. कालच्या प्रवासात घाट उतरतांना काळ्या कभीन्न मेघांतून लाखाखत्या हजार डोळ्यांनी माझा वेध घेतला. ते डोळे दाखवणाराच वरुणदेव!
हे समजल्यावर चेहऱ्यावर फुलणारं हास्य बाईंपासून लपत नाही.'ज्ञातव्यं ज्ञातवान्' (समजायचं होतं ते समजला) याची जाणीव बाईंना होऊन त्यांच्याही चेहऱ्यावर स्मित दिसतं. आणि पुढल्या मंत्रात सहस्रपाशांनी बांधलेला अनृत वागणारा कोणी...", वगैरे वगैरे हजाराची गणना ती कोण व कशी करणार.
खारघरला अर्णवची सहपाठी कालिंदी भेटली. कामत काका-काकूंनी खारघर ला चहापानाने छान पाहूणचार केला. सहज कोणाच्याही घरी न जाण्याच्या माझ्या आड वृत्तीला ओलांडले गेले. या सगळ्यात भर म्हणून ऊन्हाळ्यातल्या सकाळी भोवनी केलेले कलिंगड साक्षीला होतेच. वरुणही सूर्यासमोर येऊन आपली प्रसन्नता दाखवत होता.
एक टप्पा पार केल्यावर पुढील वाटचालीची स्वप्न सहजच फुलतात. तसंच आता सायकलोपासनेच्या पुढील टप्प्याची कुणकुण लागली आहे.

