विदिशेला पोहचलो. खूप आनंद होतो आहे. स्वतःच्या मर्यादा उल्लंघल्या मुळे असावा. जबलपूरहून निघून पश्चिमेची वाट धरली, विदिशेच्या दिशेने. आपण मेघ मार्गानेच निघालो आहोत का? असा प्रश्न दोन दिवसांमध्ये अनेक वेळा पडून गेला.
जबलपूरहून निघाल्यावरचे पहिले मुक्काम अगदी अनिश्चित होते. जास्तीत जास्त पुढे जाता येईल एवढाच विचार होता. दुपारी 1.30 वाजेपर्यंत भूक लागलेली होती. पुढे धाबा लागला की थांबायचं. कारण बाकी कुठे सोय होईल अशी स्थिती दिसत नव्हती. चहा पिऊन कुठे जेवायची सोय होते आहे का वगैरे एका ठिकाणी पडताळून पाहीलं होतं. बेलखेडा गावाहून जात असताना एका तरूणाने आवाज देऊन थांबवलं. विचारपूस केली आणि जेवण झालं का विचारलं. माझं नकारात्मक उत्तर ऐकून जेवायचं निमंत्रण दिलं. हर्यंश आणि देवांश हे दोघे भाऊ. एकत्र कुटूंब पद्धतीत राहणारे. हर्यंश bsc computer science होऊन MPPSCचा अभ्यास करत होता तर देवांश bsc biotechnology शिकत होता. त्यांच्याकडूनच गावात वाढत्या गांजा-चरस च्या व्यसनाधीनतेमुळे मुलांच्या शिक्षणावर झालेल्या परिणामाविषयी माहिती मिळाली. घरी काकूंनी गरमागरम जेवण वाढलं आणि गप्पाही रंगल्या. पन्नास कि.मी. अंतरच पार केलं होतं. तिथेच थांबून चालणार नव्हतं. ऊलटा वारा झेलंत पुढचा प्रवास सुरू झाला. हिरणी नदी ओलांडून वनक्षेत्रात प्रवेश केला. साडेपाच वाजता थांबून राहण्याची सोय शोधायला बल्धा गावाच्या चहा टपरीवर थांबलो. सरपंचांचा पत्ता घेतला. ते जिल्ह्याच्या गावी गेले होते. मग गावकऱ्यांनी मुख्य रस्त्यापासून तीन कि.मी. आत पीठेरा गावात जाण्याचा सल्ला दिला. नर्मदेच्या काठी आश्रम आहे. तिथे छान व्यवस्था होईल असे आश्वासन दिले. झालेही तसेच! रामकृष्ण मिशन च्या अर्घ्यानंद महाराजांच्या आश्रमात शिरलो तेव्हा ते जेवायलाच बसले होते. मी सायकल लावे पर्यंत माझं पान वाढलेलं होतं चार ज्वारीच्या भाकऱ्या, लोणचं आणि मूगाची डाळ! झोपायच्या खोलीत एकही डास नव्हता. सगळं टाप टीप ठेवलेलं होतं. शांत झोपेसाठी अजून काय हवं असतं?
दूसऱ्या दिवशीचा प्रवास सुरू झाला.
कालिदासाने भौगोलिक वर्णन अचूक केलेलं असलं तरी वाऱ्याच्या दिशेचा विचार करता ठामपणे चूकीचे वर्णन करून "मन्दं मन्दं नुदति पवनश्चानुकूलो यथा त्वाम्" हे वाक्य सपशेल खोटं ठरतं. आम्रकूटापर्यंतच्या प्रवासात वारा अनुकूल असतो. पण नंतर, वारा प्रतिकूल होत जातो. इतका की चढ नसलेल्या रस्त्यावर 14-15 कि.मी/तास या पुढे वेग वाढवणे कठीण होते. अश्यात न बांधलेला रस्ता, माती आणि शेणावर पाऊस पडून अंगावर उडणारं ते मिश्रण, खडी, खड्डे याने सायकल चालवणं खूप कठीण झालं होतं. उदयपुराला सायकल धूतली आणि 4.30 वा. धाब्यावर जेवण केलं. तिथून सिल्वानी 28 कि.मीच्या अंतरावर होतं. तिथपर्यंत पोहचायचा निश्चय केला आणि उलट्या वऱ्याला, पावसाला न जुमानत 6.20 पर्यंत सिल्वानी गाठलं.
असो, तर या परिस्थितीत उदरपुराच्या अलिकडे "हा मेघ मार्ग असूच शकत नाही. आपण भोपाळ मार्गे परस्पर उज्जैनला जाऊयात. विदिशेनंतर वक्रः पन्थाः सांगितलं आहे, ना!" असा दुर्बळ विचारही येऊन गेला.
जबलपूरहून निघाल्यावरचे पहिले मुक्काम अगदी अनिश्चित होते. जास्तीत जास्त पुढे जाता येईल एवढाच विचार होता. दुपारी 1.30 वाजेपर्यंत भूक लागलेली होती. पुढे धाबा लागला की थांबायचं. कारण बाकी कुठे सोय होईल अशी स्थिती दिसत नव्हती. चहा पिऊन कुठे जेवायची सोय होते आहे का वगैरे एका ठिकाणी पडताळून पाहीलं होतं. बेलखेडा गावाहून जात असताना एका तरूणाने आवाज देऊन थांबवलं. विचारपूस केली आणि जेवण झालं का विचारलं. माझं नकारात्मक उत्तर ऐकून जेवायचं निमंत्रण दिलं. हर्यंश आणि देवांश हे दोघे भाऊ. एकत्र कुटूंब पद्धतीत राहणारे. हर्यंश bsc computer science होऊन MPPSCचा अभ्यास करत होता तर देवांश bsc biotechnology शिकत होता. त्यांच्याकडूनच गावात वाढत्या गांजा-चरस च्या व्यसनाधीनतेमुळे मुलांच्या शिक्षणावर झालेल्या परिणामाविषयी माहिती मिळाली. घरी काकूंनी गरमागरम जेवण वाढलं आणि गप्पाही रंगल्या. पन्नास कि.मी. अंतरच पार केलं होतं. तिथेच थांबून चालणार नव्हतं. ऊलटा वारा झेलंत पुढचा प्रवास सुरू झाला. हिरणी नदी ओलांडून वनक्षेत्रात प्रवेश केला. साडेपाच वाजता थांबून राहण्याची सोय शोधायला बल्धा गावाच्या चहा टपरीवर थांबलो. सरपंचांचा पत्ता घेतला. ते जिल्ह्याच्या गावी गेले होते. मग गावकऱ्यांनी मुख्य रस्त्यापासून तीन कि.मी. आत पीठेरा गावात जाण्याचा सल्ला दिला. नर्मदेच्या काठी आश्रम आहे. तिथे छान व्यवस्था होईल असे आश्वासन दिले. झालेही तसेच! रामकृष्ण मिशन च्या अर्घ्यानंद महाराजांच्या आश्रमात शिरलो तेव्हा ते जेवायलाच बसले होते. मी सायकल लावे पर्यंत माझं पान वाढलेलं होतं चार ज्वारीच्या भाकऱ्या, लोणचं आणि मूगाची डाळ! झोपायच्या खोलीत एकही डास नव्हता. सगळं टाप टीप ठेवलेलं होतं. शांत झोपेसाठी अजून काय हवं असतं?
दूसऱ्या दिवशीचा प्रवास सुरू झाला.
कालिदासाने भौगोलिक वर्णन अचूक केलेलं असलं तरी वाऱ्याच्या दिशेचा विचार करता ठामपणे चूकीचे वर्णन करून "मन्दं मन्दं नुदति पवनश्चानुकूलो यथा त्वाम्" हे वाक्य सपशेल खोटं ठरतं. आम्रकूटापर्यंतच्या प्रवासात वारा अनुकूल असतो. पण नंतर, वारा प्रतिकूल होत जातो. इतका की चढ नसलेल्या रस्त्यावर 14-15 कि.मी/तास या पुढे वेग वाढवणे कठीण होते. अश्यात न बांधलेला रस्ता, माती आणि शेणावर पाऊस पडून अंगावर उडणारं ते मिश्रण, खडी, खड्डे याने सायकल चालवणं खूप कठीण झालं होतं. उदयपुराला सायकल धूतली आणि 4.30 वा. धाब्यावर जेवण केलं. तिथून सिल्वानी 28 कि.मीच्या अंतरावर होतं. तिथपर्यंत पोहचायचा निश्चय केला आणि उलट्या वऱ्याला, पावसाला न जुमानत 6.20 पर्यंत सिल्वानी गाठलं.
असो, तर या परिस्थितीत उदरपुराच्या अलिकडे "हा मेघ मार्ग असूच शकत नाही. आपण भोपाळ मार्गे परस्पर उज्जैनला जाऊयात. विदिशेनंतर वक्रः पन्थाः सांगितलं आहे, ना!" असा दुर्बळ विचारही येऊन गेला.
या नकारात्मक विचारांवर मात करून सिल्वानीला पोहचलो तेव्हा पुढल्या दिवशीच्या मार्गाबद्दल प्रचंड भिती मनात होती. भिती- वाऱ्याची, चढ-घाटांची!
सिल्वानीहून निघालो तेव्हा पाऊस सुरू होता. गावाला दोन किलोमीटर मागे टाकले. कीर्र जंगलातला घाटचा चढ सुरू झाला. पुढे आठ किलोमीटर एकही गाव लागणार नव्हतं. सुरुवातीलाच, गोमांसावर ताव मारणाऱ्या गिधाडांचं दर्शन झालं. शांत पण विशाल पक्ष्याचे ते स्वरूप अचंबित करून टाकणारं होतं. मी पहिल्यांदाच या पक्ष्याला इतक्या जवळून बघत होतो. आठ कि.मी चा घाटाचा चढ संपला. गावात चहा घेतला. आणि आता पठारावरचा सरळ रस्ता सुरू झाला. तिथेही नदीचा एखादा ओहोळ रस्त्याखालून वाहण्यासाठी अधिक उतार आणि मग येणारा प्रचंड चढ (त्याला स्थानिक भाषेत 'रिप्टा' असं म्हणतात) माथेरानच्या घाटाची आठवण करून देत होता. एका पूला जवळ तीन-चार लांडगै दिसले. जरा पुढे गेलो आणि अगदी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक लांडगा. रस्ताही तीस फुटीच, सिंगल लेन! जे कान्हा-नागझिरा-ताडोबा इथेही दिसलं नव्हतं ते 'मेघमार्गा'च्या प्रवासात दिसत होतं. पाऊस अविश्रांतपणे सुरू होता. गढीच्या फाट्यावर विदिशेचा रस्ता लागला तेव्हा तिथून विदिशा तीस कि.मी.च्या अंतरावर होतं. पठार उतरणीचा भाग. उतारावरील एक शेवटचे वळण. आणि घाट संपल्यावर दिसलेले नितांत रम्य दृष्य. समोर मेघदूतातील वर्णना प्रमाणे विविध पर्वत रांगा, त्यांवर विसावलेले काळे कभिन्न मेघ आणि निस्सीम पसरलेली हिरवीगार शेती. एकेकाळच्या राजधानीचे वर्णन या वैभवापेक्षा अजून काय असावे?
मी विदिशेपासून 8-10 कि.मी अंतरावर होतो. हासूआ गावात चहासाठी थांबलो. गावतील बुजूर्ग मंडळी तिथे होती. मला मध्यप्रदेश कसा वाटला हे त्यांना जाणून घ्यायचे होते. मी म्हटलं. इतकी दूरवर पसरलेली शेती बघून खूप आवडला मध्यप्रदेश. खूप संपन्न भाग आहे हा. तोच, '"हा लेकीन पैसा नही है।"
-"पढोगे नही तो पैसा कहासे मिलेगा?" या प्रश्नावर आजोबा खूप खूश झाले आणि आपल्या दहावीत शिकणाऱ्या नातवाच्या पाठीवर हात मारून पुढे दिलखुलास गप्पा झाल्या.
सिल्वानीहून निघालो तेव्हा पाऊस सुरू होता. गावाला दोन किलोमीटर मागे टाकले. कीर्र जंगलातला घाटचा चढ सुरू झाला. पुढे आठ किलोमीटर एकही गाव लागणार नव्हतं. सुरुवातीलाच, गोमांसावर ताव मारणाऱ्या गिधाडांचं दर्शन झालं. शांत पण विशाल पक्ष्याचे ते स्वरूप अचंबित करून टाकणारं होतं. मी पहिल्यांदाच या पक्ष्याला इतक्या जवळून बघत होतो. आठ कि.मी चा घाटाचा चढ संपला. गावात चहा घेतला. आणि आता पठारावरचा सरळ रस्ता सुरू झाला. तिथेही नदीचा एखादा ओहोळ रस्त्याखालून वाहण्यासाठी अधिक उतार आणि मग येणारा प्रचंड चढ (त्याला स्थानिक भाषेत 'रिप्टा' असं म्हणतात) माथेरानच्या घाटाची आठवण करून देत होता. एका पूला जवळ तीन-चार लांडगै दिसले. जरा पुढे गेलो आणि अगदी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक लांडगा. रस्ताही तीस फुटीच, सिंगल लेन! जे कान्हा-नागझिरा-ताडोबा इथेही दिसलं नव्हतं ते 'मेघमार्गा'च्या प्रवासात दिसत होतं. पाऊस अविश्रांतपणे सुरू होता. गढीच्या फाट्यावर विदिशेचा रस्ता लागला तेव्हा तिथून विदिशा तीस कि.मी.च्या अंतरावर होतं. पठार उतरणीचा भाग. उतारावरील एक शेवटचे वळण. आणि घाट संपल्यावर दिसलेले नितांत रम्य दृष्य. समोर मेघदूतातील वर्णना प्रमाणे विविध पर्वत रांगा, त्यांवर विसावलेले काळे कभिन्न मेघ आणि निस्सीम पसरलेली हिरवीगार शेती. एकेकाळच्या राजधानीचे वर्णन या वैभवापेक्षा अजून काय असावे?
मी विदिशेपासून 8-10 कि.मी अंतरावर होतो. हासूआ गावात चहासाठी थांबलो. गावतील बुजूर्ग मंडळी तिथे होती. मला मध्यप्रदेश कसा वाटला हे त्यांना जाणून घ्यायचे होते. मी म्हटलं. इतकी दूरवर पसरलेली शेती बघून खूप आवडला मध्यप्रदेश. खूप संपन्न भाग आहे हा. तोच, '"हा लेकीन पैसा नही है।"
-"पढोगे नही तो पैसा कहासे मिलेगा?" या प्रश्नावर आजोबा खूप खूश झाले आणि आपल्या दहावीत शिकणाऱ्या नातवाच्या पाठीवर हात मारून पुढे दिलखुलास गप्पा झाल्या.
-यह बात तो सही है, पैसा नही रहेगा फिर भी यहा कोई भूका नही सो सकता।
कालिदासाने मेघाला विदिशा का दाखवली याचे उत्तर मिळाले होते.
नीचैर्गिरी वर जाऊन आलो. वेत्रवतीचे दर्शन झाले. आता जरासा मार्ग वाकडा करून उद्या उज्जैनच्या दिशेचा प्रवास सुरू करीन...
नीचैर्गिरी वर जाऊन आलो. वेत्रवतीचे दर्शन झाले. आता जरासा मार्ग वाकडा करून उद्या उज्जैनच्या दिशेचा प्रवास सुरू करीन...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा