दिवस 41-
"संधिप्रकाशात अजून जो सोने तो माझी लोचने मिटो यावी..."
वगैरे प्रेम कवितेतल्या ओळी आठवाव्यात अश्या संध्याकाळी एका अनोळखी शहरात पोहचलो. प्रचंड आनंद मनात दाटला होता. त्या कवितेचा पुसटसा विचार येऊनही गेला. पण, ही जागा त्या कवितेसाठी नव्हती! तो आनंदही त्या कवितेसाठी नव्हता.
"संधिप्रकाशात अजून जो सोने तो माझी लोचने मिटो यावी..."
वगैरे प्रेम कवितेतल्या ओळी आठवाव्यात अश्या संध्याकाळी एका अनोळखी शहरात पोहचलो. प्रचंड आनंद मनात दाटला होता. त्या कवितेचा पुसटसा विचार येऊनही गेला. पण, ही जागा त्या कवितेसाठी नव्हती! तो आनंदही त्या कवितेसाठी नव्हता.
'इति-ह-आस' हा शब्द ज्या साहित्यात सापडला तेच साहित्य बोलतं होत होतं, फक्त वातावरणाने.
एकदा वाटलं, आता शंखाचा नाद कानावर पडेल. आजचे युद्ध संपले. आता उद्या सकाळी पुढचं युद्ध सुरू होईल.
एकदा वाटलं, आता शंखाचा नाद कानावर पडेल. आजचे युद्ध संपले. आता उद्या सकाळी पुढचं युद्ध सुरू होईल.
तर दुसरीकडे वाटलं कोणीतरी या अस्ताला जाणाऱ्या सूर्या समोरील ढग हाताने बाजूला सारील आणि म्हणेल, "हा सूर्य, हा जयद्रथ!"
चिता पेटेल.
यादवी नष्ट होईल.
चिता पेटेल.
यादवी नष्ट होईल.
मी कुरुक्षेत्रावर होतो.
आयुष्याचं सार जिथे सांगितलं गेलं त्या भूमिवर होतो, आहे. उद्या गीता मंदीरात जाऊन एखादं पान वाचावं. तिथे ज्ञानेश्वरांनी यावं, विनोबांनी यावं, लोकमान्यांनी यावं. गीतेचं पान पुन्हा नव्याने उलगडावं, याच धर्मक्षेत्री.
#bgm #bergamontbicycles #starightfromstpauli #bergamontindia
#सायकलोपासना #cyclopasana
#सायकलोपासना #cyclopasana
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा